हा ब्लॉग शोधा

रविवार, २९ डिसेंबर, २०१९

रिकामटेकडे भाषांतर उद्योग: We Will Rock You

रिकामटेकडे भाषांतर उद्योग (RBU): we will rock you


एकदा बोर झालं होतं, उगीचंच online टाईमपास करायला घेतला. आमची इंग्रजीची बऱ्यापैकी मारामार आहे, तेव्हा इंग्रजी गाणी वगैरे फारशी समजत नाहीत. डोक्यावरून जातात. ताल, ठेका, संगीत कधी आवडतं, पण शब्द साले घोळ करतात. हिंदी गाण्यांमधलं रॅप पण न कळणाऱ्यांचा पिंड आपला, मग काही उपाय करून अर्थ समजला तरी बरं म्हणून एक शक्कल लढवली. म्हंटलं, गूगलचा घ्यावा फायदा. मग काय सरळ google translate वर जाऊन टाकले इंग्रजी गाण्याचे बोल. आई शप्पथ एकदम बेक्कार हालत झाली. इंग्रजी कळणं राहिलं बाजूला पण हसता हसता वाट लागली. थोडं फार इंग्रजी येतं आणि मराठी पण बऱ्यापैकी जमतं त्यामुळे असले अर्थ असूच शकत नाहीत हे एकदम स्पष्ट होतं. पण यातून एक चांगलं घडलं कि मला टाईमपास करायचा अजून एक मनोरंजक उपाय सापडला. तर हा टाईमपासचा एकदम जालीम उपाय सगळ्यांसाठीच ... 

(मूळ कवीची माफी मागत ) पेश-ए-खिदमत है उस साल का यह लोकप्रिय गीत:

Queen: We will, we will rock you

Buddy, you're a boy, make a big noise
Playing in the street, gonna be a big man someday
You got mud on your face, you big disgrace
Kicking your can all over the place, singin'

We will, we will rock you
We will, we will rock you

Buddy, you're a young man, hard man
Shouting in the street, gonna take on the world someday
You got blood on your face, you big disgrace
Waving your banner all over the place

We will, we will rock you, sing it!
We will, we will rock you, yeah

Buddy, you're an old man, poor man
Pleading with your eyes, gonna get you some peace someday
You got mud on your face, big disgrace
Somebody better put you back into your place, do it!

We will, we will rock you, yeah, yeah, come on
We will, we will rock you, alright, louder!
We will, we will rock you, one more time
We will, we will rock you
Yeah


याचं सरळ सरळ google translate वरचं भाषांतर पुढीलप्रमाणे


बडी, तू मुलगा आहेस, मोठा आवाज कर
रस्त्यावर खेळत आहे, एखाद्या दिवशी मोठा माणूस होईल
तुझ्या चेह on्यावर चिखल झाला, तुझी मोठी बदनामी झाली
आपल्या कॅन ला सर्व ठिकाणी लाथ मारणे, गाणे '

आम्ही करू, आम्ही तुम्हाला दगडफेक करू
(याचा खरंच या महिन्यातल्या भारतीय घटनांशी सर्वस्वी संबंध नाहीये. google translate वरचं खरंच जसंच्या तसं भाषांतर आहे )
आम्ही करू, आम्ही तुम्हाला दगडफेक करू

बडी तू एक तरूण माणूस आहेस
रस्त्यावर ओरडणे, एखाद्या दिवशी जगाचा सामना करायचा आहे
तुझ्या चेह on्यावर रक्त आहे, तुझी मोठी बदनामी झाली आहे
आपले बॅनर सर्वत्र फिरवित आहे

आम्ही करू, आम्ही तुम्हाला रॉक करू, गाणे!
आम्ही, आम्ही तुम्हाला अडकवू, होय

बडी, तू म्हातारा आहेस, गरीब माणूस
डोळ्यांतून भिजत आहे, तुम्हाला कधीतरी शांतता मिळवून देईल
तुझ्या चेह on्यावर चिखल झाला, मोठी बदनामी
कुणीतरी आपल्यास आपल्या जागी परत आणा, तसे करा!

आम्ही करू, आम्ही तुम्हाला अडकवू, होय, होय, चला
आम्ही, आम्ही तुम्हाला जोरात, जोरात!
आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला मागे टाकीन
आम्ही करू, आम्ही तुम्हाला दगडफेक करू
हो

याचा पुरावा म्हणून हा screenshot. ज्यांना अगदीच हवंय त्यांनी स्वतः https://translate.google.co.in/ वर चेक करून पहा!




हसून हसून पोट दुखतंय...
नंतर परत असंच कधीतरी आणि वेगवेगळ्या गाण्यांच्या google translate वरचं अगदी जश्यास-तसं भाषांतर घेऊन पुनः पोष्ट करीन...

मंगळवार, २४ डिसेंबर, २०१९

पावट्याचं निमित्त


पावट्याचं निमित्त

म्हणी मला खूप आवडतात. मागच्याच वेळी एक म्हण लिहिण्यात आली आणि या पोस्टचं निमित्त झाली.
आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक अशी गोष्ट म्हणा/ क्रिया म्हणा... आहे जी फारच सामान्य/ नेहेमीचीच आहे. सगळे लोक करतात पण सार्वजनिकरित्या हि गोष्ट टाळली जाते, किंबहुना तिचा उल्लेख पण आपण शक्यतो टाळतोच. मोकळेपणे याविषयी बोललं जात नाही. ह्या क्रियेविषयी बोलणं म्यानारलेस किंवा असांस्कृतिक, असामाजिक वगैरे समजलं जाऊ शकतं. पण आज इथे आम्ही या गोष्टीवरच लिहिणार !

तेव्हा आजचा विषय आहे  "पादणे "

बऱ्याच लोकांना हि क्रिया असभ्य वगैरे वाटते, पण हा एक अत्यंत नैसर्गिक शरीरधर्म आहे. शिंक येणे, खाज येणे हे जितकं नैसर्गिक, तितकीच नैसर्गिक असते हि "पाद-क्रिया"! माणूस/बाई जेवढ्या मोकळेपणे शिंकते तेवढ्या मोकळेपणे पादत मात्र नाही. काही लोकांना हि क्रिया आत्यंतिक असांस्कृतिक वगैरे वाटते. अशा व्यक्ती आपण जसं पादतच नाही असा अविर्भाव चेहेऱ्यावर आणून बसतात. पण जेवढं महत्त्वाचं शिंक येणं तेवढंच महत्त्वाचं पादणं असं माझं वैयक्तिक पण स्पष्ट मत आहे. या संपुर्ण विश्वात सर्वात समाधान किंवा सुख कशाने मिळते तर ते म्हणजे ज्या ठिकाणी खाज आलीये बरोब्बर त्याच स्पॉटला खाजवता येणे किंवा मोकळेपणे पादणे! जर कोणी मला सर्वात सुखी माणसाचं चित्र काढ असं म्हंटलं तर मी मोकळेपणे पादणाऱ्या व्यक्तीचं चित्र काढेन (बायका पादत नाहीत वगैरे मिथ्या गोष्टी आहेत. इथेपण टक्करका सामना मिळू शकतो हे मी शपथेवर सांगेन). पादणे हा आपल्या जीवनातला बहुमूल्य भाग आहे. (नाहीतर बसा पॉट धरून, डोकं धरून, 'मला कि नई कसंतरीच होतंय' म्हणत. एकदा का टुररकऩ पादलं कि सगळे त्रास बंद आहे कि नाही जादू! म्हणून बहुमूल्य!) आपण चारचौघात पादायला, त्याविषयी बोलायला संकोचतो खरं पण आपल्याला हे पण माहिती पाहिजे कि हि नैसर्गिक बाब फक्त हसण्यावारी नेण्यासारखी नाहीये. म्यानर्स च्या नावाखाली जर पादवायू फारवेळ दाबून ठेवला तर एखाद्याचा जीव पण जाऊ शकतो हे आपल्याला माहीतच नसतं. थोडा जिभेवर ताबा ठेवला तर हे प्रसंग टाळता येऊ शकतात पण कायमच नाही. तेव्हा आयुष्यभर संकोच करण्यापेक्षा मोकळेपणे,बिनधास्तपणे पादावं. एक्स्क्यूझ मी किंवा सॉरी म्हणून मोकळं व्हावं, एवढं सोप्पं आहे हे! आपण कितीतरी वेळा अश्या प्रसंगात असतो जेव्हा हे आपण करतो पण ! मस्तपैकी हसतो आणि मजा घेतो. कधी कधी विचार येतो कि हे जे महान वगैरे लोक होऊन गेले त्यांच्या आयुष्यात पण काही असे प्रसंग आलेच असतील नाही! त्यांच्या चरित्रांमध्ये एकदाही अशा मजेशीर प्रसंगाची नोंद आढळत नाही. कितीही झालं तरी हाडा-मांसाची माणसं ती ! ती कधी पादलीच नसतील हे म्हणणं अनैसर्गिक ठरेल नाही? पादण्याचा पण उल्लेख इतिहासात असता तर इतिहास सुद्धा आवडीचा विषय झाला असता.

(कधी असाच विचार करता-करता खालचे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. तसे काल्पनिक आहेत पण असे घडले पण असतील, कदाचित Image building वगैरे त्याही काळात असल्याने वगळले असतील चरित्रांमधून!
प्रसंग क्र.१: असा मस्तपैकी दरबार भरलेला आहे. कर माफ करण्याविषयी चर्चा चालू आहे, ब्रेक ची वेळ झाली. पावट्याची भाजी मस्तच झाल्याने जास्तंच खाऊन पादशाह सदरेवर आले आणि मधेच पादशाहांनी त्यांची तशरीफ थोडी वरच्या दिशेला ढकलली आणि शंखनाद केला. पावट्याचं महत्त्व लक्षात आल्याने पादशाहाने हुकूम दिला "कर ६२% वाढावा" (त्याला पावट्यावरचा कर वाढवायचा होता पण संतापात कर वाढवा म्हणाला ). सगळ्यांवरचाच कर ६२% वाढविण्यात आला.(६२% का ? तर असंच ! माझ्या डोक्यातली ष्टोरी आहे मला वाटलं ६२% म्हणून ६२%!)
प्रसंग क्र.२:  सामान्यांना कळेचना की कर माफ होणार असताना कर का वाढला, त्यामुळे सामान्य जनतेत अराजकता माजली. क्रांतिकारी संघटना स्थापन झाल्या. त्यांनी पादशाह सोबत युद्धाचं रणशिंग फुंकलं. पादशाहला तोपर्यंत पादण्याची सवय झालेली, पावटा जेवणात असो वा नसो! युद्ध सुरु झालं, वेगवेगळी शस्त्र वापरण्यात आली पण युद्धाच्या शेवटाचा मार्ग दिसेना. परस्पर सामंजस्याने युद्ध संपवावं असा ठराव पादशाहाने क्रांतिकारकांच्या लीडर समोर ठेवला.
प्रसंग क्र.३:  क्रांतिकारकांचा लीडर आणि पादशाह भेट होणार असते. पावट्यावरचा कर का वाढवला हे लीडरला समजावणार या धुंदीत पादशाह असतो. लीडर येतो, बैठक सुरु होते. पादशाहला त्याची चूक लक्षात येते एका पावट्यामुळे त्याने सर्व वस्तूंवर कर लादला, आणि तो कर माफ करायच्या निर्णयावर येतो. सवयीनुसार प्रेशर वाढल्याने पाद-वायू हळूच सोडण्याच्या प्रयत्नात एकदम जोरदार आवाज होतो. बैठकीत हसावं कि नाही या विवंचनेत बाकीचे असताना पादशाहाच जोरात खळखळून हसतो आणि खोटं- खोटं सांगतो की हा पावट्याच्या भाजीचा प्रताप आहे. आणि अशा प्रकारे पावट्याला निमित्त करून राजाने आपण पाद्रे आहोत हे मान्य करायचं टाळलं ! 
(यावरूनच पुढे महान म्हण अस्तित्त्वात आली "पाद्र्याला पावट्याचं निमित्त! ") कर रद्द झाले आणि युद्ध संपलं. 
वरच्या (भंगार छाप) लेखनावरून मी पुढच्या हाऊसफुलची स्क्रिप्ट लिहू शकेन असं वाटायला लागलंय! असो! )
तर... पादणं वाईट असतं का? नक्कीच नाही! उलट आपली पचनक्रिया व्यवस्थित असल्याचं मूर्तीमंत लक्षण आहे पादणे! पूर्वी इजिप्त का कुठले लोक म्हणे पादवायू बरणीत बंद करून ठेवत आणि आरोग्यासाठी चांगलं म्हणून त्याचा वास घेत असत. असो! पादण्याचे पण प्रकार असतात हे ३ इडियट्स मधे सांगितलंच आहे. हळूच पादणं काहीच लोकांना जमतं, स्किलच असतं ते ! काहीजण फक्त वास सोडतात आणि दुसऱ्यांवर नाव घेतात. (पाद-शाह शब्द यांच्याच मुळे आला असावा ) सुरतमध्ये पूर्वी एक स्पर्धा पण झालेली पादायची! अतिउत्साही कार्यकर्त्यांनी अशा स्पर्धांना जायला हरकत नाही.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे पादण्याने बी.पी. व्यवस्थित राहतं. रणवीर ची चिंग्स ची ऍड पाहिल्यावर प्रश्न पडला खरंच आग लागू शकते? तर हो! आपल्या  पादवायूला आग लागू शकते. प्राणी, किडे वगैरे सुद्धा पादतात! एका माणसाने दावा केलेला कि त्याच्या पादण्याने डास मरतात!
आता तुम्ही म्हणाल डोक्यावर पाटी लिहून फिरायचं का की "आम्ही पादतो"? असं म्हणणं नाही, पण जे गुप्त टूरक्या सोडून "मी नाही त्यातली" असं भासवतात किंवा पादवायू दाबून ठेवतात त्यांनी Denial मधे राहून स्वतःची तब्येत बिघडवून घेऊ नये. पादण्यामुळे मिळणाऱ्या आंतरिक सुख-समाधानाचा आस्वाद मोकळेपणे घ्यावा आणि दुसऱ्याला हसवण्याने मिळणारं फुकटचं पुण्य कमवावं !
  
अखिल भारतीय 'होईल वाद, पण हक्काने पाद' कमिटीला सादर समर्पित !

ता. . : मी प्रयत्न केला चित्र काढायचा तो पुढीलप्रमाणे:







शुक्रवार, २० डिसेंबर, २०१९

एक आठवण : बच्चू


एक आठवण : बच्चू


आता हा meme(याचा उच्चार "मीम" असा होतो "मे मे" नाही हे कळायला खूपच वेळ गेला, म्हणून विंग्रजीत लिहिलंय, असो) पाहिल्यावर बराच वेळ हसण्यात गेला. पु.. आणि त्यांचं लिखाण आठवलं. त्यांची बरीच वाक्यं दैनंदिन आयुष्यात काही प्रसंगांच्यावेळी राहावून आठवतात. वरच्या त्यांच्या वाक्यांनी माझ्या आयुष्यातल्या एका नग मित्राची खूपच आठवण आली. (तुम्हाला वाटलं असेल मी रा.गां. वर लिहीन काही, तर जाम भ्रमनिरास वगैरे होणारे तुमचा... एक तर मला त्याच्यावर लिहिण्यात (अजून तरी ) इंटरेस्ट नाहीये. जेव्हा येईल तेव्हा बघू... आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याची आठवण या प्रसंगी मला झालीय तो काही याच्यापेक्षा कमी नाहीये. थोडक्यात काय तर माझ्या डोक्याला झालेला ताण इथे लिहून मोकळा करणार आहे. )

तर, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या ओळखीची अशी एक तरी व्यक्ती असतेच की जी आत्यंतिक बधिर लेव्हलची असते आणि तरीही ती आपल्या आयुष्यात असते ( पण का ? असा प्रश्न डोक्यात येत राहतो... माणसं Erase/delete नाही ना करता येत... पण कधी वाटतं बरंय यार ! अशी माणसं नसली तर आयुष्यात variety काय राहील, तर असो! ) अशी ती चिवित्र व्यक्ती म्हणजे आमचा बच्चू ... (उगीच सतत बच्चन देतो म्हणून बच्चू! क्यूट वगैरे आहे म्हणून नव्हे!) तर हा आमचा बच्चू गूगल चा जरा जास्तंच वापर करतो. याला वाटतं कि आपणच लै भारी... आपण नेटफ्लिक्स वगैरे टाईप्स अँप्स वापरतो, ओरिजिनल्स, विंग्रजी सिनेमे, सिरिअली वगैरे पाहतो म्हणजे आपण अमेरिकेतच जन्मायला हवे होतो असा थोडक्यात यांचा chutzpah... (chutzpah हि द्यावी वाटली तरी शिवी नाहीये याचा अर्थ इथे पहा https://en.wikipedia.org/wiki/Chutzpah. हा शब्द माझ्या शब्दकोशात यायचं कारण पण हाच महाभाग ! कधी वाटतं तिकडेच जन्माला आला असता तर बरं झाला असतं.) हा एकदा बोलायला सुरुवात झाली कि कमीत कमी तीन-चार तास गेलेच समजायचं . त्यामुळे हा भेटला कि काहीतरी करून विषय टाळून तिथून पोबारा करणे हे आपलं डोकं शांत ठेवण्याचं एकमेव सोल्यूशन आहे.तसा हा मनाने एवढा पण वाईट नाहीये, म्हणून आमच्यासारखे लोक त्याला सहन करतात. पण डोक्याला मुंग्या येणे काय असतं हे याच्या सहवासात प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं.(जे आहे ते आहे यार !) तर असा आमचा बच्चू बरेच महिन्यांनी भेटला तो टी-शर्ट, हाफ प्यांट, डोळ्यावर गॉगल, स्लीपर अशा अवतारात! बरेच दिवसांनी भेटला म्हणून थोड्या गप्पा मारल्या इकडच्या-तिकडच्या!(म्हणजे तो बोलत होता आणि आम्ही (आदरार्थी अनेकवचनी) होकारार्थी मान हलवणे, हं-हं करणे, झालंच तर एखाद वाक्य बोलणे असं चाललं होतं आता सटकायची वेळ आलेली) तो पर्यंत सगळं काही व्यवस्थित होतं, मला वाटलं सुधारला हा... पण कुठून दुर्बुद्धी झाली च्यामारी आणि तोंडातून निघून गेलं कि "दुनिया गोल है". बस्स झालं तर काम. (काही लोक आपल्या प्रत्येक गोष्टीवर आक्षेप घेतात आणि त्यांचं म्हणणंच कसं बरोबर आहे हे (आपण तुझंच बरोबर असं म्हणून सुद्धा) पटवून देतात त्यांचा लीडर आहे हा बच्चू !) माझ्या वाक्याला 'म्हण' म्हणून न घेता चॅलेन्ज म्हणून घेतलं याने ! (पाद्र्याला पावट्याचं निमित्त !) माझ्याकडे तुच्छ नजरेने पाहत आणि जवळपास तीन तास पृथ्वी गोल नसून सपाटच आहे यावर डोस पाजले.(आर्यभट्ट, न्यूटन वगैरे मंडळी यांच्या दृष्टीने येडे ! इथे अशा प्रसंगी पुलं ची वरच्या मीम मधली वाक्यं (आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्त्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं. विषय कुठलाही असो.) त्यांनी जशी म्हंटली तशीच्या तशी डोक्यात वाजतात...हा जन्म-कर्माने कुठला ते वेगळं सांगायलाच नको !) ह्याच्या तावडीतून सुटण्यासाठी पृथ्वीचं काय घेता, अख्ख ब्रह्माण्ड सपाट आहे हे मान्य करायला मी तयार आहे (भीक नको पण कुत्र आवर!). तर आम्ही कसे कोणीही काहीही सांगतं त्यावर विश्वास ठेवतो, वर्षानुवर्षे काही लोक सर्वांना पृथ्वी गोल आहे हे सांगून मुर्खात काढतात, नासा वगैरे पीपल्स कसे conspiracy वगैरे करतात आणि आमच्यासारख्या सामान्यांना भ्रमात ठेवतात, वगैरे वगैरे पोटतिडकीने पटवून देत माझे तीन तास सुद्धा याने लीलया सपाट करून टाकले. याच्या कोणत्याही गोष्टीला मी आक्षेप घेण्याची हिम्मत केली नाही कारण त्यामुळे आणि वेळ सपाट झाला असता! (अशा वेळी कंठ शिव्यांनी पार दाटून आलेला पण आवरलं)

बरेच दिवसांनी भेटल्यावर generally लोक तुझं काय- माझं काय, याचं काय-त्याचं काय वगैरे बोलतात, आठवणींना उजाळा देतात पण आमचा बच्चू नॉर्मल च्या व्याख्येत कुठेच बसत नाही! त्यानंतर एक अत्यंत मौल्यवान फोनकॉल श्री बच्चू यांना आल्यामुळे माझी त्या भेटीतून सुटका झाली (पुलं म्हणाले होते त्याप्रमाणे त्या व्यक्तीचा मी खरंच जाहीर मुका घ्यायला सुद्धा तयार आहे!) या ऐतिहासिक भेटीनंतर कमीत कमी दोन दिवस डोक्याला मुंग्या आल्या होत्या! अपरिहार्यता, उद्वेग, अगतिकता वगैरे शब्दांचे अर्थ या प्रसंगामुळे अगदीच कळाले हीच एक काय ती जमेची बाजू!

नुसतं आठवणीने सुद्धा डोकं पार जाम झालाय त्यामुळे इथेच थांबलेलं बरं!




बुधवार, ११ डिसेंबर, २०१९

हे भलते अवघड असते


हे भलते अवघड असते

आपल्या जवळच्या व्यक्तींना आपण किती जपतो, त्यांचं आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे ती व्यक्ती दूर जाते तेव्हा मनात येतं. तो पर्यंत आपण त्यांचं असणं गृहीत धरत असतो. नंतर आपण असं वागलो असतो, असं जपलं असतं त्या व्यक्तीला, हे सर्व विचार करून हळहळण्यात काहीच पॉईंट नसतो.

ती प्रिय व्यक्ती सोबत असताना आपल्याला तिची किंमत कदाचित आपल्याला कळत नाही कारण नकळत आपण गृहीत धरलेलं असतं कि आपली व्यक्ती कायम राहणार आपल्या सोबत! आपण काळाच्या ओघात विसरूनच जातो कि हे सर्व शाश्वत नाहीये. इथे शाश्वत असेल तर एकंच गोष्ट... ती म्हणजे मृत्यू !
या मृत्यूचीच सर्वात जास्त भिती वाटते. का ? तर आपण गुंतत जातो, नात्यांमध्ये, माणसांमध्ये, भावनांमध्ये ! संवेदनशील असलं ना तर जरा जास्तंच भिती वाटते मृत्यूची. कदाचित स्वतःच्या नसेलही वाटत, पण जवळची व्यक्ती नसू पण शकते या शक्यतेला सुद्धा मन घाबरतं, भिती वाटते. ही वेळ दुसऱ्यावर असेल तर आपण किती सहजतेनं म्हणून जातो कि "खंबीर रहा", "आम्ही आहोत या दुःखात सोबत", पण खरंच त्या व्यक्तीचं दुःख आपल्याला कळतं ? त्या व्यक्तीने त्याच्या जवळच्या माणसासोबत घालवलेले अनेक क्षण, आनंदाचे म्हणा किंवा दुःखाचे आपल्याला माहीतही नसतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातलं त्या जवळच्या माणसाचं महत्त्व आपल्याला कळण्याच्या पलीकडे असतं. अशा वेळी आपण सोबत आहोत एवढीच सांत्वना देऊ शकतो. या उपर काहीच शक्य नसतं. अवघड असते अशी वेळ...

आयुष्याचं पण विशेष आहे... सुख किंवा दुःख काहीच कायम राहत नाही. काही काळ खूप त्रास होतो आपलं माणूस नसण्याचा, पण हळू हळू सवय होत जाते त्या माणसाच्या नसण्याची. याचा अर्थ आपण त्यांना विसरलो का? तर नक्कीच नाही. कुठेतरी ती व्यक्ती नसण्याची सल मनात राहतेच. इतर गोष्टी, व्यक्ती, प्रेम यांमुळे त्या जखमेवर खपली येते. ती जखम बरी होतेही कदाचीत, पण ह्या जखमा व्रण मात्र सोडून जातात. ह्या जखमा असतात खऱ्या पण खरं कौशल्य त्यात अडकून पडता पुढे जाण्यात आहे. सोपं तर नक्कीच नसतं, वेळ सुद्धा भरपूर लागतो पण आयुष्याचा Show must go on...  इतरही महत्त्वाच्या व्यक्तींचं प्रेम स्वीकारायचं आणि move on करायचं आयुष्यात. आज ना उद्या आपलं destination पण तेच शाश्वत सत्य आहे, पण त्याचाच विचार करत कुढत जगण्यापेक्षा "आज" चा स्विकार करून मस्तपैकी जगणं जमलं पाहीजे

आयुष्य मस्तपैकी जगलंच पाहिजे...




सोमवार, २१ ऑक्टोबर, २०१९

बातमीप्रेम


कालपरत्वे माणसाने बदलावं, हे तसं पाहता सहसा बरोबरच! पण या हि गोष्टीला अपवाद असतातच... लहानपणी ७ च्या बातम्या ते आजच्या २४ तास चालणाऱ्या वेगवेगळ्या वृत्त वाहिन्या (च्यायला अवघड आहे, त्यापेक्षा न्यूज चॅनल च म्हंटलेलं बरं) सतत पाहणारे काही महाभाग ओळखीचे आहेत. आमच्या शेजारी एक कुटुंब राहत असे. आमचे आजही नेहेमी येणे-जाणे असल्याने त्यांचं वेळापत्रक (TV चं ) छानपैकी माहिती आहे. त्या घरी राहणाऱ्या सर्व मंडळींची एक बेक्कार सवय आहे. त्यांच्या घरी TV दिवसभर चालू असतो. रात्री झोपायची वेळ झाली हेच एकमेव कारण बिचाऱ्या TVला विश्रांती देऊ शकतं. तुम्ही म्हणाल लाईट गेले तर ? त्यांच्याकडे जनरेटर आहे... (जास्त डोकं लावू नका, त्यांचं TV बिल, वीज बिल आम्ही किंवा तुम्ही भरत नसल्याने काही आक्षेप घेऊ शकत नाही.) तर ह्या मंडळींविषयी का लिहिलंय असं वाटणं स्वाभाविक आहे. पण ह्या पोस्टचं शिर्षक बातमीप्रेम असं आहे आणि यांच्या कुटुंबापेक्षा बातमीप्रेमाचं उत्तम उदाहरण असूच शकत नाही कारण हे जे दिवसभर टीव्ही चालतो, त्यावर फक्त आणि फक्त बातम्यांचेच चॅनल अखंड चालतात.

यांच्या कुटुंबातील व्यक्ती घरी आलं रे आलं कि पहिले त्यांचं आवडतं न्यूज चॅनल लावणार आणि (अगदी लहान मुलांना चॉकलेट वगैरे खाऊ मिळाल्यावर जो आनंद, जे समाधान मिळतं त्या लेव्हलच्या समाधानी चेहेऱ्याने) बातम्या पाहणार. मग त्यावरच्या बातम्यांनी पोट भरलं की दुसरा न्यूज चॅनल लावणार. (प्रोग्रामिंग मध्ये लूप ची संकल्पना यांच्यामुळेच आली असावी असं वाटतं. असो... ) हे न्यूज चॅनल वाले पण कमाल असतात राव, एकच बातमी प्रत्येक चॅनल वर वेगवेगळ्या पद्धतीने सादर करतात. ही creativity जबरदस्तच शिकण्यासारखी असते. (इथे मला आमच्या शिक्षणाचे दिवस आठवतात. पेपर लिहिताना आमच्यासारखे (आदरार्थी अनेकवचनी) सामान्य लोक उत्तराची लांबी वाढवण्यासाठी जी creativity वापरायचो ती हीच! फार फायदा होतो बरं! पण ते असो...)

तर असंच बातमी पाहता पाहता वेळ होते ती त्या debate ची... (आईशप्पथ जाम बोर होतं लोकांना टीव्ही वर भांडतांना पाहून. प्रत्यक्षातली भांडणं जास्त भारी असतात. एकदा रस्त्यावरून जाताना एक नवरा बायकोचं भांडण पाहिलं, जाम मजा आलेली... ती बाई त्या बाबाला हातात सापडेल त्याने मारत होती (दुसऱ्याच्या दुःखात आनंदी वगैरे होणाऱ्यातले नाही आपण, पण ते एकंदरीतच जाम विनोदी होतं) तो माणूस फुल्ल टुन्न होता आणि तिचा मार चुकवला कि एकदम खुश व्हायचा स्वतः वर आणि टाळी वगैरे वाजवायचा... शेवटी ती बाईच हसली याच्या अशा वागण्यावर, दमली पण होती बिचारी, शेवटी कपाळावर हात मारून निघून गेली...तर असो) अशा debate वेळी या मंडळींना जाम ऊत येतो. ते सर्व जण या debate वर ते प्रत्यक्ष घरीच चालू असल्यासाखे चवीने चर्चा करतात. आणि अशा चर्चेच्या वेळी जर कोणी चुकून घरी आलं, तर त्या व्यक्तीला सुद्धा (परीक्षेत कम्पलसरी प्रश्न असल्यासारखं) त्या चर्चेत सामील व्हावं लागतं. मधे एखादा ब्रेक वगैरे आलाच तर पाहुण्याला चहा-पाणी मिळतं, त्या वेळात त्याचं म्हणणं ऐकलं जातं आणि मग पुन्हा राष्ट्रीय कर्तव्य असल्याप्रमाणे सगळे debate वर परत भिडतात. या वेळापत्रकात कित्येक वर्षात काहीच बदल नाही. इतर लोकांच्या घरात ज्या चवीने आणि प्रेमाने सास-बहू वगैरे सिरीयल चालतात त्या प्रेमाने, त्या गोडीने, न्यूज चॅनलच्या टीआरपी ची जबाबदारी फक्त आणि फक्त यांच्या खांद्यावर असल्यासारखे हे लोक इथे न्यूज चॅनल पाहतात. (आता न्यूज चॅनल हि काय चवीने पाहायची गोष्ट आहे? एखाद्याने गोगलगाय खाऊन "वा! काय सुंदर चव आहे" असं म्हणून आयुष्यभर गोगलगाई खाण्यासारखं आहे हे ! (मला गोगलगाईची चव कशी काय माहिती? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे पण मी शुद्ध शाकाहारी आहे आणि गोगलगाय नुसती पाहून पण जाम किळस येते मला त्यामुळे ती खायला सुद्धा तशी किळसवाणीच असावी अशा पूर्वग्रहामुळे फक्त उदाहरणादाखल लिहिलं आहे. Animal rights वाल्यांनी फार मनावर घेऊ नका आम्ही (आदरार्थी अनेकवचनी)फक्त बडबड करतो.)

मी सुद्धा बातमीप्रेमी आहे काही अंशी. पण आपल्याला त्या न्यूज चॅनल्सचा जाम कंटाळा आहे राव...बरेचदा सीरिअसच असतं सगळं...सगळंच मजेशीर असावं असं आपलं(आदरार्थी अनेकवचनी! भारी वाटतं) मत नाही. पण नकारात्मक, सिरिअस पाहून पाहून डोकं पार हँग होऊन जातं. (महत्त्वाच्या बातम्या, बातम्या सांगणारे अँकर, पत्रकार वगैरे मंडळींवर अजिबात राग नाही. त्यांचं काम महत्वाचंच आहे पण एका लिमिट पेक्षा जास्त वास्तविकता पण सहन नाही होत मला. विरंगुळा हवाच आयुष्यात.) तर, उगीचच असणाऱ्या बातम्या आणि त्यांच्यावरच्या कमेंट्स वाचायला मला बरेचदा आणि फार आवडतं. आजकाल अशा बातम्या, त्यांच्या वरच्या कमेंट्स वाचणं असा छंदच जडलाय. विशेष म्हणजे अशा बातम्या असतात पण ढिगानं! ताजतवानं वाटतं अशा बातम्यांमुळे.
उदाहरण म्हणाल तर आता काही दिवसांपूर्वी एका प्रतिष्ठित वर्तमानपत्राच्या वेबसाईट वर दोघे पाठमोरे बसल्याचा फोटो होता. त्याचं शीर्षक असं होतं कि "हे लोकप्रिय कपल कोणतं आहे माहितेय का ?" आता हे फार साधं काहीतरी आहे असं वाटेल पण खरी गम्मत कमेंट मधे होती. त्यावरची सर्वात भारी कमेंट एकाने टाकलेली कि "ढुंगणावरून माणसे ओळखण्याइतपत इथली जनता अजून साक्षर झाली नाही. शैक्षणिक अभ्यासक्रमात या प्रगल्भ विषयाचा समावेश व्हावा." (दिवसच भारी गेला राव हे वाचून…) हे तर फक्त एकंच उदाहरण आहे. असं दररोज नवनवीन काहीतरी पाहिलं-वाचलं कि डोक्याचा बराचसा शीण नाहीसा होतो. ( अजूनच उदाहरणं म्हणाल तर - चुईंगगम चघळल्यामुळे होतं वजन कमी. कसं ते जाणून घ्या, रहस्यमय किड्याची मुंबईत दहशत, भंगारातल्या कार उडवण्याची स्पर्धा, भारताच्या विजयावर तैमूरचा जल्लोष, तैमूर माझा गोजिरवाणा वगैरे वगैरे (हो! हि मी interest घेऊन वाचलेल्या काही बातम्यांची शीर्षकं आहेत! duh!)) त्यामुळे वाटतं की कश्या का असेना बातम्या खरंच खूप आवश्यक आहेत.

(असो! अजून काही सुचत नाहीये आणि लिहून दमायला झालं आता, आता थांबतो आम्ही!(आदरार्थी अनेकवचनी))

बातमीप्रेम वगैरे काहीतरी लिहूनही हे पूर्ण वाचल्याबद्दल अभिनंदन!





शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

पाऊस असा रुणझुणता...

आज अगदीच रिमझिम चाललीये पावसाची... अशी सुरुवात आणि title फक्त उगाच भारी वगैरे वाटावं म्हणून लिहिलंय. भर ऑक्टोबरात बिन सीजन बदाबदा कोसळणाऱ्या पावसाला पाहून असं काही सुचणं केवळ अशक्य किंवा फारच poetic वगैरे असू शकतं. काव्यमय वगैरे काही आपलं (आदरार्थी एकवचनी ! कोणी आपला आदर केला नाही तरी चालेल पण स्वतःला आपण वगैरे म्हंटलं कि जाम भारी वाटतं) मन नाही. कॉलेजात असताना बरेचसे पावसावर कविता करत असताना मोह झाला... म्हंटलं पावसावर आपणही करू कविता पण "टीप टीप" शिवाय काही सुचलं नाही पावसाविषयी... द्राक्षांचा व्यवसाय असल्याने म्हणा किंवा द्राक्षांवर प्रेम असल्याने म्हणा पण पावसाऐवजी द्राक्षांवर सुचली कविता...  (त्यातला शेवटचा भाग येथे टाकत आहे...किंबहुना तेवढंच आठवतंय आता)

"थोडी-थोडी हिरवी, खाल्ली भरपूर काळी,
परसाकडची घाई झाली नक्को त्या वेळी... "

आता एवढी वास्तववादी कविता पावसावर होणंच शक्य नव्हतं... आणि द्राक्षांवर प्रेम असलं म्हणून काय हो ते प्रेम जास्त झालं कि काय वेळ आणतं हे व्यक्त नको व्हायला ! तर असो पावसावरून द्राक्षांवर भरकटलोय हे कळालं. पण त्यानंतर कविता वगैरे प्रकार करायला रामराम ठोकला तो कायमचाच.

तर पाऊस ...  संदीप सलील चं हे पाऊस असा रुणझुणता  गाणं ऐकलं कि पावसाळा फारच romantic आहे असं वाटतं, पण ते मगाशी म्हंटल्याप्रमाणे फक्त title भारी वाटावं म्हणून घेतलंय. बाकी पाऊस म्हंटलं कि रिपरिप, चिकचिकाट झालेले रस्ते,गढूळ पाण्याने भरलेले रस्ते, डेंग्यू , मलेरिया, कुबट वास येणारे कपडे, पावसावरच्या अगणित कवितांचा पाऊस वगैरे वगैरे डोक्यात येतं. आता एवढंच येत का डोक्यात तर नाही हो... मातीचा तो मस्त वास, बहरलेली हिरवी गार सृष्टी, वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम कांदाभजी वगैरे plus points पण आहेत पण हे आनंदाचे क्षण, हे  plus points घरकोंबड्यांसाठी! एखाद दिवस छान वाटतं हो पण दररोज पावसात गेलं कि वैतागच येतो. मग मी वर म्हंटल्याप्रमाणे गोष्टी मनात यायला लागतात. अर्थशास्त्रात एक सिद्धांत आहे "law of diminishing marginal utility" (ज्यांना अगदीच माहिती हवी आहे त्यांना त्याविषयी इथे सापडेल), आपल्या पावसाचं पण तसंच आहे. सुरुवातीला पाऊस जाम भारी वाटतो आणि हळूहळू 'कधी संपेल एकदाचा' असा होऊन जातो. आणि एवढं सगळं असून सुद्धा लोक लिहिणार कशावर तर म्हणे पाऊस! (आता आपल्याला पण मोह झालाच म्हणा पावसावर लिहिण्याचा... काहीतरी जादू आहेचे गड्या पावसात... पण आपलं वेगळं आहे!)

लहानपणीचा पाऊस म्हंटलं कि आठवतं कि कागदाच्या होड्या बनवायचो आणि सोडायचो पावसाच्या पाण्यात. त्या होड्यांची race लावायचो. त्यात पण मजा होती... जसे जसे मोठे झालो तसे विचार preferences बदलले, वाफाळलेला चहा घेण्यात मजा वाटायला लागली, मग केव्हातरी कांदाभजी पण भारी वाटायला लागली, भर पावसात एका छत्रीत दोघांनी फिरणं वगैरे romantic वाटायचं...  लहानपणीचे यार-दोस्त शिक्षणाच्या ओघात हरवले, नंतरच्या यार-दोस्तांसोबत चहा-कांदाभजीचे program व्हायला लागले. इथपर्यंत पाऊस लईच भारी वाटायचा. नंतर शहरात आलो सगळे आणि सगळंच बदललं.
मग एकाच छत्रीत दोघे म्हणजे बालिशपणा वाटायला लागला. भिजायचं तर मनसोक्त भिजा, हि नाटकं कशाला, त्यापेक्षा छत्री द्या एखाद्या गरजवंताला असं वाटायला लागलं. पावसाच्या पाण्यात होड्या सोडणारे आम्ही पावसालाच पाण्यात पाहायला लागलो.

सगळ्या (रस्त्यावरच्या म्हणा किंवा आययुष्यातल्या म्हणा ) खड्ड्यांमुळे पावसावर प्रेम करण्याइतकं अवास्तववादी राहिलं नाही मन आजकाल...

असो... हे सगळं टाईप करता करता आकाश (बाहेरचं आणि आतलं पण) मोकळं झालं कि... !




गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

तो राजहंस एक...

तो राजहंस एक... 



आपलं पहिल्यापासूनच जरा वेगळंच आहे असं प्रत्येकालाच वाटतं पण आपल्यासारखे अनुभव असणारंच नाहीत म्हणून अनेक महाभागांना अंडरएस्टीमेट पण करता येत नाही. तर असो!

शाळेत असताना असंच वाटायचं कि आपल्यालाच कळलंय त्या कुरूप बदक-पिलाचं दुःख... बरं आमचं (म्हणजे आमच्या सारख्या सर्वसामान्य विद्यार्थी-विद्यार्थिनीचं ) कसं होतं ना की जोपर्यंत एखादी कविता परीक्षेमध्ये असायची तो पर्यंत ती अजिबातच झेपायची नाही. एकदा का परीक्षा संपली रे संपली कि त्या कवितांचा अर्थ थोडाफार समजायला लागे.(अजूनही बर्याचश्या कवितांचा अर्थ कळत नाही) अशाच जेव्हा (परीक्षेची) गरज होती तेव्हा न समजलेल्या कवितांपैकी हि ग. दि माडगूळकरांची सुंदर कविता.

हल्लीच्या पोरांना ह्या कविता रिलेट होतात कि नाही माहिती नाही (त्यांना मराठी तरी धड लिहिता-वाचता येते का हा प्रश्नच आहे, ते सर्व नंतर... ) पण आम्हाला अशा कविता जाम रिलेट व्हायच्या. आमच्या सुट्टीच्या वेळी " कोणी ना त्यास घेई खेळावयास संगे " आणि "भावंडं ना विचारी, सांगेल ते कुणाशी ? " वगैरे ओळी जामच आठवायच्या आणि सेंटीमेंटल कि काय व्हायचं. एकत्र कुटुंब असायची तेव्हा बरीच आणि नसली तरी सुट्ट्यांमध्ये गावी वगैरे एकत्रच यायची सर्व  चुलत, आते, मामे वगैरे भावंडं. तेव्हा असली धमाल करायचे सर्व कि एरवी मोठ्यांना घाबरणारे सुद्धा खोड्या काढायला लागायचे.

तर मुद्दा असा कि त्या कवितेतल्या कुरूप, वेड्या पिलाचं दुःख अशाच सुट्ट्यांमध्ये जी लहान भावंडं आहेत त्यांना ढिगाने व्हायचं. मोठी भावंडं गप्पांमध्ये घेणार नाहीत कारण यांना काय समजणार (आणि आधी कधी तरी गप्पांमध्ये घेतल्यावर कळलं नाही त्याचे अर्थ विचारत बसल्याने जाऊदे याला समाजवण्यापेक्षा न घेतलेलं बरं) ...आणि खेळताना तर काय पाणी पाजलंय म्हणून सांगू ... खेळून नव्हे, खरोखर पाण्याच्या बाटल्या घरातून भरून आणणे तहान लागली कि मोठ्या भावंडांना पाणी पाजणे अशी कामं करून. मोठ्यांना पाणी देणे, त्यांच्या वस्तू सांभाळणे, त्यांची कामं करणे, मैदान साफ करणे, त्यांच्या विनोदाचे विषय होणे अशा टुच्च्या कामांसाठीच लहान भावंडं असतात असा समज व्हायला लागलेला. अशा परिस्थितीत जेव्हा हि कविता परीक्षा देऊन झाल्यावर सुट्टीत थोडी फार कळायला लागली तेव्हा अगदीच सेंटी होऊन ह्या भावंडांना ऐकवली तेव्हा...
... तेव्हा ते पण सेंटी झाले असं समजलात तर साफ चुकलात लोकहो...  ती कविता ऐकवल्यावर "आले मोठे राजहंस " "पळ आता आमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये " असं म्हणून हकालपट्टी झाली आणि अशा थोड्या फार समजलेल्या कविता भावंडांना ऐकवणं सोडून दिलं.

थोडक्यात काय, आमच्यात नव्याने उमललेल्या राजहंसाचं पुन्हा एकदा बदक झालं...





बुधवार, ९ ऑक्टोबर, २०१९

असंबद्ध बडबडीची सुरुवात...

असंबद्ध वगैरे वागणे हा छंद म्हणा किंवा प्रवृत्ती पण त्यामुळे बडबडीत, लिहिण्यात सुद्धा असंबद्धता येणारच. आता यासाठी ब्लॉग वगैरे का? कशाला? कशासाठी? असे फालतू प्रश्न विचारण्यात काही अर्थचं नाही कारण मुळातच ब्लॉगचं नाव असंबद्ध बडबड असं आहे, आणि त्याचमुळे कारणं सुद्धा तशी असंबद्धच आहेत. वेळ जात नव्हता, रिकामा वेळ ढिगाने आहे, ब्लॉग फुकटच आहे. मग तुम्ही म्हणाल असे विचार एकतर मनातच ठेवायचे किंवा डायरीत वगैरे लिहायचे. पण डायरी, पेन साठी खर्च करावा लागतो. तुम्ही म्हणाल मग ऑनलाईन लिहायला पण खर्च लागतो कि , तर लोकहो माझ्याकडे उगीचच पडलेला कंप्युटर आणि इंटरनेट कनेक्शन (च्यायला हा शबद मराठीत टाईप करताना जाम तंतरलेली.) आधीच सहज उपलब्ध आहेत. त्यांचा थोडाफार सदुपयोग व्हावा आणि मनातले विचार व्यक्त करता यावे यासाठी हा प्रपंच...


आता माणूस आहे म्हंटल्यावर विचार चिक्कार येतात. मग ते विचार (कधी चांगले पण बऱ्याचदा फालतू का असेना) असे मुक्तपणे उधळावेत अश्या निश्चयाने हा ब्लॉग सुरु करत आहे. तुम्ही म्हणाल येडंच दिसतंय , पण लोकहो, मोठ्या लोकांना अशा टीकेला सामोरं जावंच लागतंय सुरुवातीला... नंतर कधीतरी ई- उत्खननात हे सापडलं तर मोठमोठे लोक याचा अर्थ लावत बसतील या आशेने (जो पर्यंत कंटाळा येत नाही तोपर्यंत (आता कोणाला ते विचारू नका)) ह्या प्रवासाला सुरुवात करत आहे...




ता. क. : मनामध्ये कित्येक विचार रुंजी घालतात, किती फुटकळ असोत किंवा चिंतनात्मक... त्या विचारांना व्यक्त करण्याचा प्रयत्न म्हणजे मनः उवाच...! एका मित्राने सांगितल्या प्रमाणे जरा update केलाय blog. header च चित्र त्याचं आहे. पहिलेपेक्षा नक्कीच छान झालंय रूपपरिवर्तन... thank god for friends..